ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल कानदुखीची समस्या सामान्य झाली आहे.
मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याआधी या उपयांच्या मदतीने कानदुखीची समस्या काही प्रमाणात कमी करु शकतात.
कानात वेदना होत असल्यात मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या गरम करुन तेल थंड झाल्यास काही थेंब कानात टाकल्याने काही प्रमाणात आराम मिळतो.
कांद्याचा रस काही प्रमाणात कोमट करुन त्याचे थेंब कानात टाकावे, असे केल्यास कानदुखीपासून आराम मिळतो.
कडुलिंबाच्या पानांचा रस करुन कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
तव्यावर मीठ गरम करुन घ्यावे,त्यानंतर कापूस गरम झालेल्या मीठाला लावून तो तुमच्या कानात ठेवावा. हा उपाय करुनही कानदुखीपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.