Holika Dahan: भारतातील 'या' गावांमध्ये नाही होत होलिका दहन

Bharat Jadhav

होलिका दहन

भारतात होळीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. परंतु काही गावं आहेत तेथे होलिका दहन केले जात नाही.

हातखोह

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात असलेलं हातखोह गाव. यात गेल्या 400 वर्षांपासून होलिका दहन केले जात नाही.

कारण काय

400 वर्षांपूर्वी जेव्हा गावात होलिका जाळली गेली तेव्हा एक मोठी आग लागली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर जळून खाक झाला होता.

महादेवासाठी नाही होत होलिका दहन

उत्तर प्रदेशातील बार्सी गावातही होलिका दहन होत नाही. होलिका दहन झाले तर महादेवाचे पाय जळतात. असा समज लोकांच्या मनात आहे.

प्राचीन शिवमंदिर

बार्सी गावात एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे महाभारत काळातील असल्याचे सांगितलं जातं.

हरणी

राजस्थानमधील हरणी गावात गेल्या 70 वर्षांपासून होलिका दहन झालेले नाही.

गोंडपंद्री

छत्तीसगडमधील गोंडपंद्री गावातदेखील शतकानुशतके होलिका दहन झालेले नाहीये.

एरुच

झाशीजवळील एरूच शहर हे हिरण्यकश्यपाचे स्थान मानलं जातं. एरुचमध्ये होलिकाची चिता ज्या अग्नीकुंडात जाळली गेली होती ती अस्तित्वात आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

होलिका दहनात शेणाच्या गोवऱ्या का जाळल्या जातात?