Surabhi Jayashree Jagdish
यंदा २ मार्च रोजी होलिका दहन होणार असून ३ मार्चला चंद्रग्रहण आहे. त्यामुळे रंगपंचमी ४ मार्चला खेळली जाणार आहे. ही बदललेली तारीख ग्रहणामुळे ठरवण्यात आली आहे.
साधारणपणे होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी होळी खेळण्याची परंपरा असते. मात्र यावेळी चंद्रग्रहणामुळे एक दिवसाचा अंतर पडणार आहे. त्यामुळे अनेकजण ४ मार्चला रंगोत्सव साजरा करणार आहेत.
चंद्रग्रहणाच्या काळात धार्मिक आणि शुभ कार्य टाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे ३ मार्चला ग्रहणाच्या दिवशी होळी खेळावी का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत धार्मिक मान्यतांनुसार काही नियम सांगण्यात आलेत.
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे ग्रहणकाळात घरात राहण्याचा सल्ला दिला जातो. पारंपरिक श्रद्धेनुसार या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा एक्टिव्ह होते. त्यामुळे बाहेर जाणं टाळावं.
होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावण्यासाठी घराबाहेर पडतात. हा सण आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. पण ग्रहणामुळे या परंपरेत बदल होऊ शकतो.
धार्मिक मान्यतांनुसार ग्रहणाच्या काळात होळी खेळणं टाळावं असं सांगितलं जातं. कारण या वेळी बाहेर फिरणे किंवा सण साजरा करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे लोकांना संयम पाळण्याचा सल्ला दिला जातो.
असं मानलं जातं की, ग्रहणातून येणाऱ्या किरणांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या काळात होळी न खेळण्याचा सल्ला दिला जातो.