Manasvi Choudhary
कामामध्ये बिझी राहल्यामुळे किंवा प्रवासामुळे लघवी थांबवून ठेवली जाते. पण तुम्हाला माहितीये का? लघवी थांबून ठेवण्याची ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
लघवी रोखून धरण्याचे आरोग्यावर होणारे कोणते घातक परिणाम आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
लघवी बराच वेळ रोखून धरल्यामुळे मूत्राशयात बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. यामुळे वारंवार जळजळ होणे, पोटात दुखते ज्याचा थेट त्रास किडनीपर्यंत पोहोचू शकतो.
लघवीमध्ये कॅल्शियम, यूरिक ॲसिड आणि इतर मिनरल्स असतात. जर तुम्ही नियमितपणे लघवी रोखून धरली, तर हे घटक मूत्राशयात किंवा किडनीमध्ये जमा होऊन खडे तयार होतात.
मूत्राशय एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लघवी साठवून ठेवू शकते. पण ती सतत दाबून ठेवल्याने मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमजोर होतात.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे मूत्राशयावर अतिरिक्त ताण येतो यामुळे किडनीवर दाब पडतो
लघवी रोखल्यामुळे पोटाच्या खालच्या भागात आणि पाठित तीव्र कळा किंवा वेदना होऊ शकतात. तसेच शरीरातील विषारी घटक योग्य वेळी बाहेर न पडल्यामुळे संपूर्ण शरीरावर सूज येऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.