Surabhi Jayashree Jagdish
उत्तर प्रदेशचा इतिहास खूप समृद्ध आणि वैभवशाली आहे. इथे अनेक राजांनी आणि सम्राटांनी मोठमोठे किल्ले बांधले आहेत. या किल्ल्यांमध्ये मुगल आणि बुंदेलखंडचा इतिहास दिसतो.
आग्रा किल्ला, कालिंजर किल्ला, चुनार किल्ला हे प्रसिद्ध आहेत. प्रयागराजमधील अकबराचा किल्ला देखील खूप महत्त्वाचा आहे. झांसीतील किल्ला सुद्धा ऐतिहासिक वारसा मानला जातो.
या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? हा प्रश्न अनेक पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना पडतो. त्याचे उत्तर प्रयागराजच्या किल्ल्यात दडलेलं आहे.
मुगल बादशाह अकबराने 1583 साली हा किल्ला बांधला. प्रयागराजमधील संगमाच्या किनारी हा भव्य किल्ला आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा मानला जातो.
या किल्ल्याची रचना आणि स्थापत्यकला खूप खास आहे. इथे असलेला अक्षय वट मोठे आकर्षण मानले जाते. पर्यटकांसाठी नुकतेच काही भाग खुले करण्यात आले आहेत.
हा किल्ला पाहण्यासाठी वर्षभर कधीही जाता येते. तो प्रयागराज रेल्वे स्टेशनपासून सुमारे 8 किलोमीटरवर आहे. स्टेशनवरून ऑटो आणि टॅक्सी सहज उपलब्ध असतात.
किल्ल्याचा मोठा भाग भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे सर्व भाग सामान्य लोकांना पाहता येत नाहीत. तरीही अक्षय वट आणि पातालपुरी मंदिर पाहण्यास मिळते.