Manasvi Choudhary
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार उच्च रक्तदाब ही गंभीर समस्या बनली आहे. उच्च रक्तदाबाकडे वेळीच लक्ष न दिल्यास तुम्हाला हार्ट अटॅक धोका संभावतो.
रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचारासोबतच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आपल्या आहारात नेमके काय खावे आणि काय खाणे टाळावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
केळी, संत्री, डाळिंब, पालक आणि रताळे यांमध्ये पोटॅशियम भरपूर असते, जे शरीरातील सोडिअमचा प्रभाव कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
मेथी, पालक, तांदुळजा यांसारख्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
बदाम, अक्रोड, जवस आणि सूर्यफूलाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते
लसणाचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या नॉर्मल राहण्यास मदत होते.
मिठातील सोडिअममुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. पॅकबंद अन्न, चिप्स, पापड आणि बाहेरचे खारट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि मैद्याचे पदार्थ यामध्ये अनहल्दी फॅट्स आणि सोडिअमचे प्रमाण खूप जास्त असते.
कडक दूध-साखरेचा चहा किंवा अतिप्रमाणात कॉफी पिण्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो.
लोणची, सॉस, केचअप आणि डबाबंद पदार्थांमध्ये टिकून राहण्यासाठी मिठाचा वापर जास्त केला जातो, जे हाय बीपीच्या रुग्णांसाठी विष समान आहे.
दारू आणि सिगारेटमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे बीपी वेगाने वाढतो.