Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पर्यटकांचे आकर्षण आहे.
पूर्णगड हा किल्ला पूर्णगड गावातच येतो.
पूर्णगड गावातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीच्या तीरावर पूर्णगड किल्ला वसलेला आहे .
पूर्णगड गावात गेल्यावर अवघ्या 10 मिनिटांत तुम्ही या किल्ल्याला पोहचाल.
पूर्णगड किल्ल्याजवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे .
पूर्णगड किल्ल्यावरून चोर दरवाजाने तुम्ही समुद्राकडे जाऊ शकता.
पूर्णगडाच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचे मंदिर आहे.
पूर्णगड बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम थांबवले. म्हणून या किल्ल्याला पूर्णगड नाव देण्यात आले.