Sakshi Sunil Jadhav
सकाळचे १० वाजले की घामाच्या धारा लागायला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसात सगळ्यांनीच विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
पुढे आवाहन आरोग्य विभागाकडून काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पुढे काही टिप्स दिल्या आहेत.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे.
ओआरएस, लिंबूपाणी आणि ताकाचा वापर करा. कारण उन्हामुळे शरीरातले क्षार कमी होतात. त्यामुळे ORS, लिंबूपाणी आणि ताक फायदेशीर ठरतं.
कलिंगड, टरबूज, द्राक्षे, संत्री यांसारखी पाण्याने समृद्ध फळं खा. जमल्यास रोज नारळपाणी पित राहा.
सैल, हलक्या रंगाचे आणि सुती कपडे घाला. त्याने शरीर थंड राहतं.
बाहेर पडताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करा. पण दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका.
उन्हाळ्यात हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. त्यात पाण्याचा वापर जास्त करा.
चक्कर, थकवा, डोके दुखणे किंवा उलट्या वाटल्यास लगेच सावलीत जाऊन विश्रांती घ्या.