Shruti Vilas Kadam
दर तासाला सुमारे ३० सेकंद पायाच्या बोटांवर उभे राहण्याची सवय लावा. यामुळे पिंडरीच्या स्नायूंना सक्रिय ठेवण्यास आणि रक्ताभिसरणाला मदत होऊ शकते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दर एक-दोन तासांनी काही घोट पाणी पिण्याची सवय ठेवावी. पुरेसे पाणी रक्ताभिसरणासाठी महत्त्वाचे आहे.
सकाळी पायांवर थंड पाणी घेण्याचा उपाय काही निरोगी व्यक्तींना उपयोगी ठरू शकतो. मात्र हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असल्यास हा उपाय टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दर अर्ध्या ते एका तासाने उठून थोडे चालणे किंवा हालचाल करणे महत्त्वाचे आहे. सतत बसून राहण्याची सवय रक्तदाब आणि रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते.
सकाळी व्यायामासोबत पाय भिंतीला टेकवून हृदयाच्या पातळीपेक्षा वर सुमारे १५ मिनिटे ठेवण्याचा उपाय सांगितला आहे. यामुळे पायांमधील रक्त हृदयाकडे परत जाण्यास मदत होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी केवळ या सवयी पुरेशा नाहीत. संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे.
हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असल्यास कोणताही नवीन उपाय स्वतःहून सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.