Shreya Maskar
जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोजच्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून तुम्हाला हृदयविकाराचा झटक्याचा धोका टाळता येतो किंवा कमी करता येतो.
आजकाल धूम्रपान-मद्यपान करणे ही फॅशन मानली जाते. मात्र यामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते, रक्तदाब वाढतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हृदयाचे कार्य बिघडते. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, उच्च रक्तदाबावर नियमित लक्ष ठेवण गरजेचे आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, त्यामुळे मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी कायम ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवावे.
रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे. जर तुम्हाला दररोज ७ तासांपेक्षा कमी झोप मिळत असेल, तर त्यामुळे रक्तदाब आणि तणाव दोन्ही वाढतात. शिवाय, अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील दाह (सूज) देखील वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला नुकसान पोहोचू शकते.
सततचा तणाव हे हार्ट अटॅकचे मुख्य कारण आहे. कॉर्टिसोलची (तणाव संप्रेरक) उच्च पातळी हृदय , रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर दबाव आणते. नियमित व्यायामाने आपले मन शांत करण्याचा आणि तणावाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करा.
मीठ आणि अतिरिक्त साखर जास्त असलेले पॅकबंद पदार्थ खाणे आताच बंद करा. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.