Shreya Maskar
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी किती वेळा खावे यापेक्षा, ते काय आणि किती प्रमाणात खातात याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे.
मधुमेहामध्ये, कर्बोदकयुक्त पदार्थांचा रक्तातील साखरेवर थेट परिणाम होतो. त्याचबरोबर, इन्सुलिन आणि काही विशिष्ट औषधे घेत असताना जेवणाच्या वेळांकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे.
बहुतेक लोकांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण नियमित वेळी करणे हा साधारणपणे एक चांगला दृष्टिकोन आहे. या दरम्यान एक छोटा, पौष्टिक नाश्ता घेणे देखील गरजेचे आहे.
मधुमेहामध्ये केवळ जेवणाची वेळच महत्त्वाची नाही, तर तुम्ही किती प्रमाणात कर्बोदकयुक्त पदार्थ खाता हे देखील महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ उपवास केल्यानंतर अचानक जास्त कर्बोदके आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर बिघडू शकते. आपल्या आहारात भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश करावा.
हृदयविकाराची समस्या असलेले लोक जरी वेळेवर जेवत असतील तरी, जास्त मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि पॅकबंद पदार्थ असलेले जेवण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. हृदयरुग्णांनी प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांसोबतच भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि मासे यांना प्राधान्य दिले पाहिजे.
जर तुम्ही इन्सुलिन किंवा मधुमेहाची औषधे घेत असाल, ज्यामुळे रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते, तर न्याहारी न करणे, दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा अचानक अधूनमधून उपवास सुरू केल्याने समस्या वाढू शकतात.
मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी, दिवसातून तीन वेळा मुख्य जेवणे करावे. तसेच ३ ते ४ तासांचे अंतर ठेवून एक ते दोन वेळा छोटा नाश्ता करणे गरजेचे आहे. रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवणे करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.