ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चालणे आपल्या शरीरासाठी लाभदायी मानलं जातं.
रात्री जेवल्यानंतर शतपावली केल्यास तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.
चांगली झोप लागण्यासाठी जेवणानंतर शतपावली करावी.
रात्री जेवणाच्या २ तासानंतर शतपावली करावी.
रात्री झोपण्यापुर्वी शतपावली केल्यास शरीराचे तापमाण कमी होते.
दिवसभराच्या धावपळीमुळे डोकं दुखतं त्यापासून शांती मिळण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी शतपावली करावी.
झोपण्यापुर्वी शतपावली केल्यामुळे अनेक कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़