Rohini Gudaghe
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी.
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्या. यामुळे आरोग्यावर इतर कोणते परिणाम होत नाही.
उन्हाळी लागल्यावर थंड पाण्यामध्ये २ ते ३ पुदिन्याची पाने टाकून ते प्या.
उन्हाळी लागल्यावर पाणी आणि गूळ एकत्र करून प्या. यांचे सेवन करावे.
उन्हाळी लागल्यावर कैरीच्या पन्ह्यामध्ये वेलची पावडर मिसळून प्या. चांगला आराम मिळतो.
धने, जिरे, बडीशेप भिजवून बारीक करून पाण्यात मिसळा. त्यात खडीसाखर टाकून ते पाणी प्या.
१० ते १५ ताजी तुळशीची पाने १ कप पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी गाळून त्यात १ ते २ चमचे मध घालून दिवसातून २ ते ३ वेळा प्या.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.