ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातून थंड पाणी पिण्याचा कल वाढतो.
मातीच्या मडक्यात नैसर्गिक पद्धतीनं पाणी थंड राहते.
पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो का?
कोणत्याही भांड्यात पाणी भरून ठेवल्यास आजारांचा संसर्ग होऊ शकतो.
दूषित पाणी प्यायल्यामुळे टायफॉइड आणि कॉलराचा धोका वाढतो.
भांड्यात साठवलेल्या पाण्याच्या सेवनामुळे जुलाब आणि पोटातील संसर्गजन्य आजार होऊ शकतो.
त्यामुळे मातीचे मडके दररोज स्वच्छ करून घ्या आणि फ्रेश पाणी भरा. त्यासोबतच मडके नीट झाकून ठेवा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.