Manasvi Choudhary
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कपडे लवकर सुकत नाही. तसेच पावसात भिजल्यामुळे देखील कपडे ओले होतात. अशावेळी तुम्ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
ओल्या कपड्यांमुळे त्वचेवर ओलावा राहतो. हा ओलावा बुरशी वाढवतो यामुळे मानेभोवती, काखेत आणि पाठीवर खाज सुटणे, आणि गोल चट्टे उठणे यासांरख्या समस्या उद्भवतात.
दमट कपडे त्वचेला सतत घासले जातात आणि त्वचेला हवा मिळत नाही. यामुळे त्वचेवर लालसर पुरळ उठतात, तीव्र खाज सुटते आणि जळजळ होऊ शकते.
पावसाळ्यात ओले कपडे घातल्याने बराच वेळ घातल्याने शरीराचे तापमान कमी होते ज्यामुळे सर्दी , ताप,खोकला त्रास होऊ शकतो.
पावसात भिजल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरावरील ओलसरपणामुळे संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो.
कपडे पूर्ण सुखलेले नसतील तर त्यातबॅक्टेरिया आणि जंतू वेगाने वाढतात. हे कपडे अंगावर घातल्यामुळे घामासोबत मिळून शरीराला दुर्गंधी सुटते आणि त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स किंवा फोड येऊ शकतात
पावसाळ्यात कपडे वाळवणे कठीण जाते, अशा वेळी कपडे इस्त्री करून घाला. इस्त्रीच्या उष्णतेमुळे कपड्यातील राहिलेला ओलावा आणि जंतू नष्ट होतात.
या ऋतूत घट्ट किंवा नायलॉनचे कपडे घालणे टाळा. शक्यतो सैल आणि सुती कपडे वापरा, जेणेकरून त्वचेला हवा मिळेल.
घरात कपडे वाळत घालताना फॅन सुरू ठेवा. कपडे सुकत घालताना पंख्याखाली घाला यामुळे कपडे लवकर सुकतील.