Chetan Bodke
आपण काही लोकांना तांब्याच्या बाटलीतून किंवा ग्लासातून पाणी पिताना पाहिले असेल. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे महत्वाचे आहे.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही तर, पचनक्रियाही मजबूत होते.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने कावीळ, डायरिया सारखे आजार होणार नाहीत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, तांब्यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. त्यामुळे कॅन्सर होण्यापासून तुम्ही वाचू शकतात.
तांब्याच्या भांड्यातून जेवल्याने आपली पचनक्रिया नियंत्रित राहते, तांब्याच्या भांड्यातून जेवल्याने वजन कमी होते.
तांब्याच्या भांड्यातून जेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबतच त्वचेसंबंधित आजारांपासून देखील आराम मिळतो.
तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून सकाळी उठून पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
दिवसभर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये, कारण चक्कर येणे, पोटदुखी, किडनी निकामी होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने शरीरातले कॉपरचे प्रमाण वाढते.
तांब्याच्या भांड्यातून जेवल्याने हाडं मजबूत राहतात. त्यासोबतच संधिवातही कमी होऊ शकते..
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.