Shruti Vilas Kadam
जेवण सुरू करण्याच्या 10–15 मिनिटे आधी १ ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पचनसंस्था सक्रिय होते आणि भूक संतुलित राहते.
जेवताना जास्त पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस dilute होतात, त्यामुळे अन्न नीट पचत नाही.
जेवताना अन्न घशात अडकल्यास किंवा तोंड कोरडं वाटल्यास १–२ घोट पाणी पुरेसं असतं.
जेवण झाल्यानंतर त्वरित पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते आणि गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या तक्रारी वाढू शकतात.
हा काळ पचनासाठी योग्य मानला जातो. या वेळेनंतर पाणी प्यायल्यास अन्न नीट पचण्यास मदत होते.
थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी पचन सुधारते आणि वजन नियंत्रणातही मदत करू शकते.
आम्लपित्त, मधुमेह किंवा पचनाच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी पिण्याची वेळ ठरवावी.