ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळशीचा काढा रोज सकाळी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
या काढ्यामुळे सर्दी, खोकल्यास आराम मिळून, घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते.
हा काढा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतो.
तसेच तुम्हाला मानसिक ताण असल्यास तुळशीच्या काढ्याचे सेवन करु शकता. तुळशीचे पाणी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.
दररोज सकाळी तुळशीचा काढा प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि हलके वाटते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.