Chetan Bodke
आपल्या दररोजच्या जेवणाची चव वाढावी यासाठी आपण फोडणीमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणामुळे आपलं जेवण चविष्ट होते.
लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्माचा आरोग्याला भरपूर फायदे होतो. त्यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होते.
पण अनेकजण लसणाला उग्र वास येत असल्यामुळे लसूण खाण्याचे टाळतात. पण त्याच लसूणमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
नियमितपणे रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. सोबतच रक्तातली साखरही नियंत्रणात राहते.
रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने मेंटल हेल्थ सुधारते. सोबतच मन शांत राहते आणि आपल्याला नैराश्यासोबत लढण्याची ताकद देते.
लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक सारखे गुणधर्म असतात.
त्यामुळे कॅन्सरचा धोका असल्यास सकाळी काहीही न खाता लसूण चघळावा.
वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास दररोज रिकाम्या पोटी लसूणच्या पाकळ्या खावाव्यात.
लसणामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.