ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीचे पान पूर्णपणे नैसर्गिक असते. त्यावर जेवण केल्यास आरोग्य सुरक्षित राहते.
गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्यावर पानातील नैसर्गिक सुगंध अन्नात मिसळला जातो, त्यामुळे जेवण अधिकच चविष्ट लागते.
केळीच्या पानावर असलेले नैसर्गिक एन्झाइम्स पचन सुधारण्यास मदत करतात आणि पोट हलके राहते.
केळीच्या पानात जंतुनाशक गुण असतात, त्यामुळे अन्न ताजे आणि स्वच्छ राहते. तसेच संसर्गाचा धोका कमी होतो.
केळीची पाने नैसर्गिक असल्यामुळे ती वापरल्याने प्लास्टिक व कचरा कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण ही होते.
भारतीय संस्कृतीत केळीच्या पानात जेवणे शुभ मानले जाते. सण, लग्न व धार्मिक कार्यक्रमात याला विशेष महत्त्व दिले जाते.
जेवण झाल्यावर पान सहज गुंडाळून टाकता येते. भांडी धुण्याचा त्रास कमी होतो आणि स्वच्छता राखली जाते.
केळीच्या पानात जेवल्याने लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स अन्नात मिसळतात.