Shreya Maskar
सापुतारा-नाशिक महामार्गावर अवघ्या ६ किमी अंतरावर असलेला 'हातगड किल्ला' हा सापुताराजवळील ऐतिहासिक ठिकाण आहे. हा किल्ला ३,६०० फूट उंचीवर वसलेला आहे.
हातगड किल्ला १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी महामार्गापासून १९० पायऱ्यांची आणि १.५ किमी अंतराची वाट आहे. तुम्हाला येथे ट्रेकिंग करून जावे लागते.
हातगड किल्ल्याच्या शिखरावर दोन उभे पाषाणी मनोरे आहेत. पायथ्याच्या गावावरून पाहिल्यास याची खडकाळ रचना आयताकृती दिसते. हा किल्ला एका त्रिकोणी आकाराच्या खडकावर वसलेला आहे. तसेच सुमारे ८ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.
हातगड किल्ला आसपासच्या व्यापारी मार्गांवर आणि दऱ्याखोऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक लष्करी चौकी आणि निरीक्षण मनोरा (वॉचटावर) म्हणून धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आला होता.
मुंबईहून नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत ट्रेनने प्रवास करा. स्टेशनपासून थेट हातगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत रिक्षा किंवा टॅक्सी करा.
हातगड किल्ला 'गंगा' आणि 'यमुना' नावाच्या दोन मोठ्या नैसर्गिक, कमानीच्या आकाराच्या जलकुंडांसाठी (पाण्याच्या साठ्यांसाठी) प्रसिद्ध आहे. जी प्राचीन काळी पाण्याचे स्रोत म्हणून वापरली जात होती.
शिखरावर पर्यटकांना भगवान गणेश, भगवान शिव आणि हनुमान यांची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या शिखरावरून सापुताराच्या हिरव्यागार टेकड्या, आसपासचे सुरगाणा गाव आणि दाट जंगलांनी व्यापलेल्या दऱ्यांची विलोभनीय दृश्ये दिसतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.