ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील ऐतिहासिक, साहसी आणि नैसर्गिक सुंदरताने परिपूर्ण असलेले हरिश्चंद्रगड हे पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी परफेक्ट ठिकाण आहे.
ऐतिहासिक महत्व असलेला हा प्राचीन किल्ला निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. या ठिकाणावरुन तुम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
हरिश्चंद्रगड प्रत्येक ऋतुत ट्रेकिंगचा वेगळा अनुभव देतो. जून ते सप्टेंबर या काळात, तुम्ही धुक्यांची पसरलेली चादर, हिरवेगार डोंगर तसेच ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.
मुंबईपासून १७० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. येथे पोहोचण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंबई- नाशिक महामार्ग. हा रस्ता माळशेज घाटातून जातो.
पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग मार्गाचा स्टार्टिंग पॉईंट असलेल्या खिरेश्वरला पोहोचण्यासाठी नारायणगाव आणि ओतूर मार्गे प्रवास करा.
हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके कल्याण आणि इगतपुरी आहेत. या स्टेशनपासून तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता.
तुम्ही हरिश्चंद्रगडला जात असाल तर तुम्ही जवळच असलेल्या माळशेज घाटला देखील भेट देऊ शकता.