Yash Shirke
हनुमान म्हणजे मारुतीरायाला शेंदूर अर्पण करतात. मंदिरात मारुतीच्या मूर्ती समोर शेंदूर चढवला जातो.
पण मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? तुम्हाला ठाऊक आहे का?
एका प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली, तेव्हा ते सीता मातेकडे गेले.
सीता मातेने कुंकू म्हणजेच शेंदूर/ सिंदूर लावताना मारुतीरायाने पाहिले आणि कुंकू लावण्यामागचे कारण विचारले.
प्रभू रामचंद्राच्या उदंड आयुष्यासाठी मी कुंकू लावते, असे सीता माता म्हणाल्या.
हनुमंताने शरीरभर शेंदूर लावून घेतले. तेव्हापासून मारुतीरायाच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा सुरु झाली अशी आख्यायिका आहे.
हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने जेव्हा भक्त शेंदूरने टीळा लावतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होते असे म्हटले जाते.
दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?