Dhanshri Shintre
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निर्मित बारवी धरण १९६३च्या सुमारास बांधण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातल्या औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवण्याच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली.
पावसाळ्यात मुसळधार पावसात भिजण्याची आणि धरण भरून वाहताना धबधबा पाहण्याची आणखी वेगळी मजा असते.
शनिवार, रविवार, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बहुसंख्य पर्यटक येतात.
बदलापूर स्थानकात उतरून मुरबाडच्या दिशेने साधारण १४ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.
रात्री १० नंतर सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही. रात्री निवासाची सुविधा उपलब्ध नाही.
बदलापूर येथे निवासाची आणि जेवणाची सोय होऊ शकते.
बारवी धरणातील अथांग पाणी, बाजूला घनदाट जंगल, वनराई यामुळे हे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावे असेच असते.
ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कुटुंबीयांसमवेत एक दिवसाची चांगली सहल होऊ शकते.