ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी पेय प्यायल्यास शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते.
सकाळी अनेक जण जीरं पाणी किंवा ग्रीन टीने सुरुवात करतात.
दोन्ही पेयांचे अनेक फायदे आहेत. परंतु तुमच्या आरोग्यासाठी कोणते पेय फायदेशीर आहे, जाणून घ्या.
ग्रीन टीमध्ये अनेक पोष्टिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेशी संबधित अनेक समस्या दूर होतात.
ग्रीन टीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील मुरुमे देखील कमी होण्यास मदत करतात.
जीऱ्याचे पाणी प्यायल्याने चेहरा चमकदार होतो. आणि डाग कमी होतात.
जिऱ्यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. जेणेकरुन पचनक्रिया सुरळीत राहते.