Shraddha Thik
आजकाल नात टिकवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून नात्यात वाद सुरु होतात.
आजकाल नाती टिकवणे कठीण होत चालले आहे असे म्हणूया. नातं जितक्या लवकर तयार होतं तितक्याच लवकर तुटतं.
अशा परिस्थितीत, मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी सांगितलेली अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जी तुमचे नाते घट्ट होण्यास मदत करु शकते.
प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास दररोज सोशल मीडियावर प्रेरणा आणि ज्ञानाने भरलेले व्हिडिओ शेअर करत असतात.
अध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास यांनी त्यांच्या एका व्हिडीओमध्ये नाती कशी मजबूत करावीत हे सांगितले आहे, जाणून घेऊया...
गौर गोपाल दास म्हणतात की, समोरची व्यक्ती काय म्हणते ते आपण ऐकले पाहिजे. आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यासाठी ऐकणे आवश्यक आहे.
माणसाला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून, ते काय म्हणतात ते ऐका आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.