Shreya Maskar
गोरखगड किल्ला ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, मुरबाडपासून सुमारे २४ किमी अंतरावर वसलेला आहे. पावसाळ्यात येथे नक्की जा.
ऐतिहासिक काळात गोरखगड किल्ल्याचा वापर टेहळणीची जागा, लष्करी तळ आणि ध्यान-साधनेचे ठिकाण म्हणून केला जात असे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला गोरखगड किल्ला २,१३७ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उंच आणि निमुळता होत जाणारा नैसर्गिक खडकाचा सुळका होय.
८० ते ९० अंशांच्या कोनात कोरलेल्या रोमांचक पायऱ्यांवरून प्रवास करून किल्ल्यावर पोहचता येत. किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगांची ३६०-अंशांची विहंगम दृश्ये दिसतात.
मुंबईहून गोरखगड किल्ल्यावर जाण्यासाठी मध्य रेल्वेने कल्याण स्टेशनला जा. तेथून पुढे एसटी बसने मुरबाड येथे पोहचा. त्यानंतर शेअरिंग टॅक्सी , रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी (देहरी) येऊन किल्ल्यापर्यंत ट्रेक करा.
गोरखगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक मोक्याची टेहळणी चौकी म्हणून वापरला जात असे. या किल्ल्यामुळे मराठा सैन्याला शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि जुन्नर, नाणेघाट यांच्यातील प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यास मदत होत असे.
ऐतिहासिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, गोरखगड किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात (सुमारे २०० ई.स.पूर्व ते १९० ई.स.) झाली असावी आणि नंतर १३ व्या शतकात यादव राजवटीने याचा अधिक विकास केला असावा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.