ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना हिवाळा ऋतु आवडतो. पण या ऋतुत अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा अनेक आजारांचा धोका वाढतो.
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तहान कमी लागू शकते. पंरतु शरीराला आवश्यक पाणी प्यायले पाहिजे. शरीर निरोगी राहते.
हिवाळ्यात आपण अनेक आजारांना बळी पडतो.त्यामुळे दररोजच्या आहारात पालेभाज्या, फले आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करावा
हिवाळ्यात नियमित व्यायाम केले पाहिजे. जेणेकरुन शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
व्यायामाबरोबरच शरीराला विश्रांतीचीही गरज आहे. किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या.
हिवाळ्यात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित योग आणि घ्यान करा.
हिवाळ्यात आलं, तुळस, दालचिनी, वेलची किंवा पुदिना यांचा चहा घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रोज भिजवलेले बदाम खा, होतील अनेक फायदे