ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
दररोज फळे खाल्याने शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळतात.
पण तुम्हाला माहीती आहे का, रात्री काही निवडक फळे खाल्याने शरीराला खतरा निर्माण होऊ शकतो, जाणून घ्या.
रात्री संत्री द्राक्षे आणि अननस सारखी फळे खाल्याने छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होऊ शकते.
कलिंगड आणि टरबूजात पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रात्री पोटात खूप त्रास होऊ शकतो.
आंबा आणि केळ्यामध्ये कॅलरीज असल्यामुळे रात्रीच्या वेळी सेवन केल्यास पचनक्रिया मंदावू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.