Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Surabhi Jayashree Jagdish

पुणे जिल्ह्यातील किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांचा मोलाचा वाटा होता. हे किल्ले केवळ लढायांचे साक्षीदार नसून प्रशासन, नियोजन आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी केंद्रे होती.

कोणत्या किल्ल्यांना द्याल भेट

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गड आजही मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. इतिहास, निसर्ग आणि प्रेरणा यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पुण्यातील किल्ल्यांना भेट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सिंहगड

सिंहगड हा तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे अजरामर झाला. किल्ल्याची भौगोलिक रचना संरक्षणासाठी अत्यंत मजबूत होती. इतिहासातील थरारक लढाई प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इथे भेट द्यावी.

राजमाची

राजमाची किल्ला व्यापार मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. घनदाट जंगल आणि उंच कडे यामुळे तो सुरक्षित मानला जात असे. इतिहासासोबत निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी हा किल्ला खास आहे.

लोहगड

लोहगड हा स्वराज्याच्या खजिन्यासाठी वापरला जात होता. गडाची रचना मजबूत असून प्रवेशमार्ग सुरक्षित होते. महाराजांच्या आर्थिक व्यवस्थेची कल्पना घेण्यासाठी इथे भेट द्यावी.

राजगड

राजगड हा शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होता. महत्वाचे निर्णय, सभा आणि राजकारण याठिकाणी केलं जात होतं. स्वराज्याची सुरुवात समजून घेण्यासाठी हा गड महत्त्वाचा आहे.

तोरणा

तोरणा हा महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला मानला जातो. याच विजयाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. इतिहासातील पहिला टप्पा पाहण्यासाठी तोरण्याला भेट द्यावी.

किल्ल्यांचं महत्त्व

हे किल्ले एकमेकांना मदत होईल अशा अंतरावर बांधले होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही रचना अत्यंत प्रभावी होती.

कोणत्या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरू नये?

vegetables not to use ginger paste | saam tv
येथे क्लिक करा