Yash Shirke
२४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
औरंगजेबाच्या नावावरुन 'औरंगाबाद' हे नाव ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते.
सातव्या शतकात छत्रपती संभाजीनगरचा संदर्भ आढळतो. त्यावेळेस 'राजतलक' किंवा 'राजतडाग' असे त्या ठिकाणचे नाव होते.
सातवाहन काळात या ठिकाणाला 'खडकी' म्हणत असल्याचा संदर्भ आढळतो.
इतिहासकारांच्या मते, १६०४ मध्ये मलिक अंबरने खडकी येथे शहर वसवले आहे.
मलिक अंबरच्या मुलाने फतेह खानने, खडकीचे नाव बदलून 'फतेहनगर' असे ठेवले.
१६५६ मध्ये औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून महाराष्ट्रात आला.
पुढे औरंगजेब याच्या नावावरुन फतेहनगरचे नाव बदलून 'औरंगाबाद' असे ठेवण्यात आले.
दगाफटका करुन जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?