Sakshi Sunil Jadhav
बरेल लोक नोकरी, बदली किंवा इतर कारणांमुळे जुन्या बँकेचं खातं बंद करायला विसरतात. पण त्या खात्यातली रक्कम कायमची नष्ट होत नाही.
जर तुमचं खातं १० वर्षांपेक्षा जास्त दिवस निष्क्रिय राहिलं आणि त्यावर दावा झाला नाही, तर ती रक्कम RBIच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीत वर्ग केली जाते.
तुमची रक्कम DEA फंडात गेली असली तरी तुम्ही किंवा कायदेशीर वारस त्यावर दावा करू शकतात. त्यामुळे पैसे कायमचे गमावले जात नाहीत.
RBI ने UDGAM पोर्टल सुरु केलं आहे. या पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर कोणत्याही बँकेत दावा न केलेली ठेव आहे का, हे सहज तपासता येतं.
दावा करण्यासाठी संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करता येतो. त्यासाठी मूळ शाखेत जाणे आवश्यक नाही.
दावा करताना आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी वैध KYC कागदपत्रे सादर करावी लागतात.
नियमांनुसार लागू असलेल्या खातेदाराला मूळ रकमेबरोबर व्याजाचाही लाभ मिळू शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित बँकेच्या प्रक्रियेनुसार घेतला आहे.
तुमच्या पालकांचे, आजी-आजोबांचे किंवा इतर कुटुंबीयांचे जुने निष्क्रिय खाते असेल तर त्यातल्या रकमेवर कायदेशीर वारस दावा करू शकतात.
दावा करण्यासाठी फक्त RBI चे UDGAM पोर्टल आणि संबंधित बँकेची अधिकृत शाखाच वापरा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शुल्क किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.