Manasvi Choudhary
आजकाल कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि अतिविचार यामुळे सतत डोकेदुखीचा त्रास सुरू असतो. महिलांसह आतापुरूष देखील या त्रासाला वैतागले आहेत.
जेव्हा स्ट्रेस खूप जास्त होतो, तेव्हा शरीरासोबतच मनावरही परिणाम होतो आणि अनेकदा ‘डोकं काम करत नाही’ अशी अवस्था होते. अशा वेळी औषधं घेण्याऐवजी तुम्ही एक साधा आणि सोपा उपाय करून पाहा.
पायांच्या तळव्यांमध्ये शरीराच्या विविध अवयवांशी जोडलेले हजारो मज्जातंतू असतात. तळव्यांना तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या
पायांच्या तळव्यांची मालिश केल्याने संपूर्ण शरीरातील नसा शिथिल होतात आणि मेंदूला शांत वाटते.
स्ट्रेस निर्माण करणाऱ्या 'कॉर्टिसॉल' संप्रेरकाची पातळी कमी करण्यासाठी तळव्यांची मालिश फायदेशीर आहे.
तळव्यांची मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होते.
स्ट्रेसमुळे अनेकदा झोप न लागण्याची समस्या होते. रात्री झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे तळव्यांची मालिश केल्याने शांत आणि गाढ झोप लागते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटते.