ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला की उष्मघात, जुलाब सारख्या आजारांचा धोका वाढण्यास सुरुवात होते.
या आजारांमुळे तुम्हाला चक्कर आणि अशक्तपणा जाणवू शकतो. अशा परिस्थितीमध्ये काही असे पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनामुळे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते,
उन्हाळ्यात ताक प्यायल्यने शरीरातील उषणता कमी होते. त्याशिवाय त्यामधील पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात उष्मघाताची समस्या बऱ्याचदा होते. अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं सेवन केल्यास उष्मघाताचा धोका टळू शकतो.
कलिंगडामध्ये पाणयाचं प्रमाण जास्त आसतं ज्यामुळे त्याचे सेवन केल्यास शरीराला हायड्रेशन मिळते.
उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो. त्यामध्ये कॅल्सियम, पोटॅशियम यासार्खे घटक शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
पुदीना उष्मघात सारख्या समस्या दुर करण्यास मदत करते. त्यानुळे त्याचं सेवन शरीरास चांगले मानले जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़
NEXT: उन्हाळ्यात घामोळ्या न होण्यासाठी काय कराल? जाणून घ्या