ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या दैनंदिन जीवनाशी संबधित अशा अनेक परंपरा हिंदू धर्मात पाळल्या जातात. यापैकी एक म्हणजे संध्याकाळ झाल्यावर झाडाची पाने आणि फुले तोडू नये.
झाडे आणि वनस्पतींनाही जीवन असते. त्यामुळे त्यांना स्पर्श केल्यास त्रास होऊ शकतो.
हिंदू धर्मात, एकाद्याच्या झोपेत अडथळा आणणे किंवा विश्रांतीच्या वेळी त्याला त्रास देणे अयोग्य मानले जाते.
झाडे आणि वनस्पतींमध्ये कीटक आणि पक्षी राहतात. जे संध्याकाळी विश्रांती घेतात. जर आपण झाडांना स्पर्श केला तर यांची झोप घरात होते.
हिंदू धर्मात पुजेसाठी सकाळीच फुल तोडण्याची परंपरा आहे. म्हणून पुजेसाठी लागणारी पाने आणि फुले सकाळीच तोडून घ्यावी.
संध्याकाळी झाडांची फुल आणि पाने न तोडण्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील आहे.
संध्याकाळच्या वेळी झाडे आणि वनस्पती कार्बन डायऑक्सइड सोडतात. म्हणून संध्याकाळ किंवा रात्रीच्या वेळेस झाडांची पाने किंवा फुले तोडू नये.