Manasvi Choudhary
शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या आजाराबद्दल संकेत देतो. अनेक लोक पायांमधील बदलांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
टाचांना भेगा पडणे, पायांना सूज येणे, सतत वेदना जाणवणे, नखांमध्ये बदल होणे या पायांच्या समस्या गंभीर आजाराच्या लक्षण असू शकतात.
टाचांना पडलेल्या भेगा या त्वचेची समस्या असू शकतात. बुरशीजन्य संसर्ग, सोरायसिस, एक्झिमा या त्वचेच्या समस्या उद्भवतात.
मधुमेहाच्या रूग्णांना रक्तातील साखरेची पातळी वाढली की पायांच्या टाचा कोरड्या होतात व भेगा पडतात.
थायरॉईची संप्रेरकांची कमतरता असल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो टाचांना भेगा पडतात, पायांवर व घोट्यावर दाब येतो.
पायांना किंवा घोट्यांना वारंवार सूज येत असेल तर शरीरात विषारी द्रव साठल्याचे चिन्ह असू शकते. शरीरात रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.
एका पायाला अचनाक सूज आल्यास ते शिरांमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचे लक्षण असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.