Sakshi Sunil Jadhav
जेवणानंतर लगेच पाणी प्यायची सवय प्रत्येकालाच असते.
तुम्हाला कधी जाणवलंय का? की जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात.
जेवण झाल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट फुगणे, गॅस, अपचनाच्या समस्या जाणवतात. हे योग्य आहे का?
पाणी ही प्रत्येक माणसाची गरज आहे. त्याने पचनक्रिया चांगल्या रितीने काम करण्यासाठी मदत होते.
पाणी पचन रस पातळ करत नाही. उलट ते अन्नाचे विघटन करण्यास आणि शरीरात पोषक तत्वे शोषण्यास मदत करते.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याने पचनास मदत होते.
जर एकाच वेळी जास्त पाणी प्यायलात तर पोटात जडपणा किंवा थोड्या काळासाठी गॅसची भावना निर्माण होऊ शकते.
जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच थोडेसे पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. आणि शरीर हायड्रेट राहतं.