Alisha Khedekar
उन्हाळ्यात डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवतात. तीव्र सूर्यप्रकाश, उष्ण हवा, धूळ आणि वाढते प्रदूषण डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात.
उन्हाळ्यात धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांत खाज, लालसरपणा आणि जळजळ वाढते. संवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जीचा त्रास अधिक जाणवतो.
अतिनील किरणांमुळे डोळ्यांचा नैसर्गिक संरक्षण थर कमकुवत होतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो.
उष्ण वारे आणि एसीमुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांत कोरडेपणा आणि अस्वस्थता वाढते.
सतत डोळे लाल होणे हे ॲलर्जी किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. वेळेत उपचार घेतल्यास गंभीर त्रास टाळता येतो.
दिवसातून काही वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुतल्यास जळजळ आणि थकवा कमी होण्यास मदत मिळते.
बाहेर पडताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरल्यास धूळ, प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते.
खाज, पाणी येणे किंवा जळजळ सतत होत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य उपचाराने संसर्ग टाळता येतो.