Dhanshri Shintre
हिवाळा आरोग्यासाठी पोषक आहार घेण्याचा सर्वात उत्तम काळ आहे.
हिवाळ्यात या फळांचे नियमित सेवन केल्यास शरीर सुदृढ राहते, प्रतिकारशक्ती सुधारते आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी संत्र्याचे सेवन उपयुक्त ठरते.
सफरचंद हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि शरीराला उष्णता देते.
पेरूमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे पचनासाठी फायदेशीर असून हिवाळ्यातील रोगांपासून बचाव करते.
हिवाळ्यात ऊर्जा टिकवण्यासाठी आणि शरीराला उष्णता देण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.
डाळिंब रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त असून हिवाळ्यातील थकवा आणि कमजोरी दूर करते.
अंजीरमध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हिवाळ्यात शरीराला पोषण देतात.
चिकू शरीराला उष्णता देऊन हिवाळ्यात ऊर्जावान ठेवते.
Next: जेवणात फोडणी देण्याचे हे आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या...