ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात खूप जास्त उष्णता जाणवते. त्यामुळे या काळात मासांहार करणे योग्य की अयोग्य याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.
उन्हाळ्यात मासांहाराचे सेवन जास्त प्रमाणात करु नये.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने यकृतात चरबीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने अपचनाच्या समस्या होतात.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मासांहार केल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे गंभीर आजार जडू शकतात.
उन्हाळ्यात मांस खालल्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो.
मासांहारात जास्त प्रमाणात कॉलेस्ट्रॉल असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.