ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात जवळपास प्रत्येत घरात तुळशीचे रोप असते. तुळशीच्या पानांना आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.
रोज सकाळी तुळशीची ४ ते ५ पाने चावून खा. तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. सर्दी, खोकला असल्यास तुळशीची पाने चावून खावे.
तुळशीच्या पानामध्ये अॅडाप्टोजन असल्याने जे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात.
जर तुम्हाला अस्थमाची समस्या असेल आणि सतत खोकला येत असेल तर तुळशीची पाने खा. याने खोकल्यापासून आराम मिळेल.
पोट दुखणे, पोट फुगणे, अॅसिडीटीचा त्रास असेल तर तुळशीची पाने खाल्ल्याने या समस्येपासून आराम मिळतो.
तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि त्वचाही चमकदार होते.
श्वासाचा दुर्गंध दूर करण्यासाठी तुळशीची पाने चावून खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात गूळ खाणं शरीरासाठी ठरेल वरदान, वाचा 'हे' गुणकारी फायदे