Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीमुळे वेळेवर आहार न केल्याने लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या येत आहेत.
खाण्यापिण्याच्या योग्य वेळा न पाळल्याने या गंभीर समस्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे.
यामुळे सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी करणे महत्वाचे आहे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर ३ तासांच्या आतमध्ये नाश्ता करणे महत्वाचे आहे.
सकाळी ७ ते ९ ही नाश्ता करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते.
दुपारचे जेवण हे नाश्ता केल्यानंतर ५ तासांनी करावे.
रात्रीचे जेवण हे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत करावे.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३ तास आधी करावे ज्यामुळे खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या