Apple Seeds: सफरचंदाच्या बिया खाल तर 'हा' होईल आजार, जाणून घ्या किती गंभीर असतो परिणाम

Dhanshri Shintre

विषारी पदार्थ

सफरचंदाच्या बियांमध्ये अॅमिग्डॅलिन नावाचे संयुग असते, जे पचनक्रियेनंतर सायनायडमध्ये रूपांतरित होते.

शरीराला हानी

अपघाताने १-२ बिया खाल्ल्यास मोठे नुकसान होत नाही, पण अधिक बिया खाल्ल्यास धोका वाढतो.

विषबाधा होऊ शकते

मोठ्या प्रमाणात बिया खाल्ल्यास डोके दुखणे, उलट्या, चक्कर येणे, श्वसनास त्रास होतो.

मुलांसाठी अधिक धोकादायक

लहान मुलांनी सफरचंदाच्या बिया खाल्ल्यास विषबाधेचा धोका अधिक असतो.

गर्भवती स्त्रियांनी टाळाव्यात

गर्भावस्थेत या बिया खाल्ल्यास अपाय होण्याची शक्यता असते.

पचनतंत्रावर परिणाम

सायनायडमुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि पोटदुखी, जळजळ होऊ शकते.

श्वसनक्रियेत अडथळा

विषारी प्रभावामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, हृदयाचे ठोके मंद होऊ शकतात.

अति खाल्ल्यास मृत्यूची शक्यता

अत्यंत जास्त प्रमाणात सायनायड शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, पण हे फारच दुर्मिळ आहे.

सावधगिरी बाळगा

सफरचंद खाण्यापूर्वी बिया काढून टाका आणि लहान मुलांना फळाच्या बिया देऊ नका.

NEXT: मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी 'हे' आहे जादूई फळ

येथे क्लिक करा