ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सर्वत्र जोरदार पावसाळा सुरुवात झालेली आहे, तर त्यासोबत अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
याच पावसाळ्याच्या दिवसात डासांमुळे डेंग्यू होण्याचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून लांब ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील.
डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरात कडुलिंबाची पाने जाळू शकता. या वासाने आणि धुराने डास पळून जातात.
दररोज घरात कमीत-कमी दोन वेळा कापूर जाळावा.कापूराच्या उग्र वासाने घरातील डास पळून जातात.
जर सतत घरात डासांची समस्या जाणवत असल्यास घरातील कोपऱ्यात लसणाची पेस्ट ठेवावी. या उपायानेही डास पळून जातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.