ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूषित पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप नुकसान होते. अशावेळी लोक घराबाहेर पडताना बाटलीबंद पाणी वापरतात.
बाटलीबंद पाण्यावर पॅकिंगची तारीख तसेच एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यावरुन, अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की पाणी देखील एक्सपायरी होते का? जाणून घ्या.
अनेक संशोधनातून असे दिसून आले की, जर नळाचे पाणी योग्यरित्या साठवले तर ते ६ महिन्यांपर्यंत पिता येते.
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जास्त काळ पाणी साठवल्याने हवेतील कार्बन डायऑक्साइड पाण्यात मिसळतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते.
पाण्याला जास्त वेळ साठवल्यामुळे पाण्यातील महत्वपूर्ण घटक नष्ट होतात. जर पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर त्याची चव थोडीशी अॅसिडिक होते.
पाणी साठवल्यानंतर साधे आणि कार्बोनेटेड दोन्ही पाणी चवीला वेगळे लागतात. परंतु ते ६ महिन्यांपर्यंत पिण्यास सुरक्षित मानले जाते.
लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार, पाणी कधीही खराब होत नाही, परंतु त्याची एक्सपायरी डेट पाण्याच्या बाटलीशी म्हणजेच प्लास्टिकशी जोडलेली असते.