Shreya Maskar
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झोपण्याआधी चुकूनही 'ही' कामे करू नये.
सूर्यास्तानंतरच्या या चुका टाळल्यास तुम्ही आर्थिक नुकसानापासून वाचाल.
सूर्यास्तानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा असावा. तसचे दरवाजा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा.
दरवाज्याच्या परिसरात घाण असल्यास त्या घरात लक्ष्मीदेवी कधीच वास करत नाही.
लक्ष्मीदेवी आणि कुबेरदेवाची उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे.
सकाळी पूजेसाठी वापरली जाणारी फुले रात्री देवघरात ठेवू नये.
संध्याकाळच्या पूजेनंतर सकाळची फुले आणि कलशातील पाणी बदलावी. त्याऐवजी नवीन फुले आणि स्वच्छ पाणी कलशात भरावे.
रात्री घरात कापूरसोबत लवंग जाळल्यास घरातील नकारात्मकता दूर होते.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही 'या' गोष्टी नियमित केल्यास तुमच्या घरात धनधान्याची वाढ होईल आणि सुख शांती लाभेल.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.