Surabhi Jayashree Jagdish
किचनमध्ये चपाती सतत करपणं ही अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. पण वास्तुशास्त्रानुसार हे फक्त स्वयंपाकाची चूक नसून घरातील ऊर्जा असंतुलनाचं संकेत मानले जातात. असं वारंवार घडत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचं मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, चपाती वारंवार करपणं हे घरात आर्थिक संकंटाचं लक्षण मानलं जातं. अचानक खर्च वाढणं किंवा बचत कमी होणं यांसारख्या समस्या दिसू शकतात. त्यामुळे याकडे एक गंभीर संकेत म्हणून पाहिलं जातं.
करपलेली चपाती वारंवार होणं हे कुटुंबात मानसिक तणाव वाढण्याचंही चिन्ह मानलं जातं. घरातील सदस्यांमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. अशावेळी संवाद कमी होऊन गैरसमज वाढण्याची शक्यता निर्माण होते.
वास्तु मान्यतेनुसार, किचनमध्ये चपाती सतत करपत असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढल्याचे संकेत मिळतात. स्वयंपाक करताना वातावरण जड आणि अस्वस्थ वाटू शकतं. घरातील सकारात्मकता कमी होऊन मानसिक थकवा जाणवू शकतो.
अन्न हे लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं प्रतीक मानले जाते. चपाती वारंवार करपणं हे अन्नाचा अनादर मानण्यात येतो. म्हणून अन्न बनवताना काळजी घेणं आवश्यक असतं.
कधी कधी करपलेली चपाती हे किचनमधील अस्वच्छतेचेही संकेत मानले जातात. तवा योग्यरीत्या न साफ केल्यास किंवा जुना वापरल्यास असं घडू शकतं. किचनमधील अव्यवस्था देखील यामागे कारणीभूत ठरते.
अशी समस्या वारंवार होत असेल तर तवा नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. स्वयंपाक करताना घाई न करता शांत मनाने काम करावं. किचन नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे.