Surabhi Jayashree Jagdish
किडनीचा आजार झाला म्हणजे लगेच किडनी निकामी झाली असा अर्थ होत नाही. CKD चे वेगवेगळे टप्पे असतात आणि डायलिसिसची गरज किडनी शरीरातील महत्त्वाची कामं पुरेशा प्रमाणात करू शकत नसताना निर्माण होते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील CKD आणि किडनी फेल्युअर या दोन वेगळ्या अवस्था आहेत. याचे गैरसमज काय आहेत ते पाहूयात
किडनीचा आजार सुरुवातीला अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं देत नाही. त्यामुळे काही त्रास जाणवत नसला तरी ब्लड आणि लघवीच्या तपासण्यांमधून किडनीच्या कार्याबाबत माहिती मिळू शकते. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी किडनीची तपासणी नियमित करणे महत्त्वाचे आहे.
पुरेसं पाणी पिणं शरीरासाठी महत्त्वाचे असले तरी त्याने किडनीचं झालेलं नुकसान बरं होत नाही. किडनीचा आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त पाणी प्यावं, असा नियम नाही.
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास त्याचा परिणाम शरीरातील इतर अवयव आणि महत्त्वाच्या घटकांवरही होऊ शकतो. CKD मुळे हार्ट आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तसंच रक्तदाब आणि कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारख्या घटकांच्या पातळीत बदल होऊ शकतो.
किडनीचा आजार समजला म्हणजे उपचारांचा उपयोग होत नाही, असं नाही. आजाराचं कारण आणि टप्पा यानुसार औषधं, आहारातील बदल आणि नियमित तपासण्यांमुळे आजाराची वाढ कमी करण्यास मदत होऊ शकते.
CKD म्हणजे किडनीला दीर्घकाळ राहणारे नुकसान किंवा किडनीची कार्यक्षमता कमी होणं, तर AKI म्हणजे किडनीच्या कार्यात अचानक झालेली घट. दोन्हींची कारणं आणि उपचार वेगवेगळे असू शकतात. काही वेळा AKI चं कारण लवकर ओळखून उपचार केल्यास किडनीची कार्यक्षमता सुधारू शकते.
किडनीच्या आजाराचा उपचार प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा नसतो आणि तो आजाराचा टप्पा, कारण व किडनीची कार्यक्षमता पाहून ठरवला जातो. अनेक रुग्णांमध्ये औषधं, योग्य आहार आणि नियमित तपासण्यांमुळे किडनीची कार्यक्षमता काही काळ टिकवून ठेवता येऊ शकते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.