Siddhi Hande
जमिनीच्या वाटणीवरुन अनेक ठिकाणी भांडणे होत असल्याचे आपण पाहिले आहे.
जमीन ही नक्की कोणाच्या नावावर होते. मुलानंतर ही संपत्ती कोणाला मिळते किंवा आजी आजोबांची संपत्ती नातवंडांना मिळते का असे अनेक प्रश्न विचारले जातात.
जर वडिलोपार्जित जमीन असेल तर ती जमीन नातवंडांना मिळू शकते. परंतु त्यासाठीही काही अटी आहेत.
आजोबांच्या हयातीत जर मुलगा किंवा मुलीचे निधन झाले तर ती संपत्ती नातवंडांकडे जाते.
जोपर्यंत आईवडिल जिवंत आहेत तोपर्यंत थेट नातवडांच्या नावावर जमीन करता येत नाही.
मृत्यूपत्र न करता जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या मालतमत्तेची समान वाटणी केली जाते.
आधी मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई अशी वाटणी केली जाते. यामध्ये सर्वांना समान वाटा मिळतो. यामध्ये नातवंडांचा समावेश होत नाही.
जोपर्यंत पहिले वारसदार जिवंत आहे तोपर्यंत थेट नातवंडांच्या नावावर थेट जमीन केली जाऊ शकत नाही.