Dhanshri Shintre
काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर त्वचेवर मुरुमे, पुरळ आणि इतर समस्या होतात, ज्या त्यांच्या त्वचेच्या संवेदनशीलतेमुळे निर्माण होऊ शकतात.
तुम्हालाही आंबा खाल्ल्यावर त्वचेच्या समस्या जाणवत असतील, तर आज जाणून घ्या त्यामागची कारणं आणि त्या त्रासांपासून बचावाचे उपाय.
तुम्हालाही आंबा खाल्ल्यावर त्वचेच्या समस्या जाणवत असतील, तर आज जाणून घ्या त्यामागची कारणं आणि त्या त्रासांपासून बचावाचे उपाय.
उन्हाळ्यात त्वचा उष्णता आणि घामामुळे आधीच कमकुवत होते, अशा वेळी आंबा खाल्ल्यास अॅलर्जीची शक्यता अधिक वाढते.
कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात आणि यामुळे त्वचेच्या त्रासासोबतच काही अंतर्गत आरोग्य समस्या देखील होऊ शकतात.
आंबा कापण्यापूर्वी त्यावरील उरुशिओल किंवा कृत्रिम पिकवणाऱ्या रसायनांचे अवशेष दूर करण्यासाठी आंबा स्वच्छ पाण्याने नीट धुणे गरजेचे आहे.
संवेदनशील त्वचा असल्यास, आंबा सोलताना हातमोजे वापरा किंवा दुसऱ्याची मदत घ्या आणि आंब्याची साल ओठ व चेहऱ्याला लागू देऊ नका.
बरेच लोक आंबा चोखायला पसंती देतात, पण यामुळे ओठ व हनुवटीभोवती पुरळ, खाज व जळजळ होऊ शकते, म्हणून टाळा.
आंबा खाण्यापूर्वी ३०-६० मिनिटं पाण्यात भिजवल्यास त्यातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे तोंडातील जळजळही कमी होते.